नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – भाजपा मधील सध्या चर्चेत असलेले आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. भाजप नेत्या व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘राहुल यांनी बोलताना मर्यादा राखावी,’ असं त्यांनी सुनावलं आहे.
लोकसभेच्या तोंडावर चंद्रपूर येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्या अपमानाचा दाखला दिला होता. ‘हिंदू धर्मात गुरू-शिष्याच्या नात्याला विशेष महत्त्व आहे. आडवाणी हे मोदींचे गुरू आहेत. मात्र, मोदी कुठलंही नातं मानत नाहीत. गुरू समोर आल्यानंतर साधे हातही जोडत नाहीत. त्यांनी आपल्या गुरूला बूटांनी मारून स्टेजवरून खाली फेकलं आहे,’ असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राहुल गांधी भाजप च्या नेत्यांकडून चांगलेच ट्रोल हो आहेत.