बहुजननामा ऑनलाईन – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती राफेल प्रकरणावरून राहुल गांधींकडून होणाऱ्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, त्यात राहुल गांधी यांच्या टीकेमुळे मोदी यांना काहीही फरक पडत नाही, कारण ते फकीर आहेत.राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि चांगला संसार करावा असे उपरोधिक टीका केली आहे .
दोन दिवसांपूर्वी पुण्यात आठवले यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी ते बोलत होते “राहुल गांधी यांच्या टीकेमुळे मोदी यांना काहीही फरक पडत नाही, कारण ते फकीर आहेत. राहुल गांधी यांनासुद्धा माझा सल्ला असेल, भविष्यात तुम्हाला काही चांगले काम करायचे असेल तर तुम्ही सुद्धा फकीर व्हा, पण ते होणार नाहीत. उलट त्यांनी लग्न करावे आणि चांगला संसार करावा. म्हणजे तेथे ते नक्कीच चांगले काम करतील असा मला विश्वास आहे.’ त्यांच्या या उत्तराने सगळीकडे मात्र हशा पसरला.