नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटवार करत जोरदार निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधी यांनी प्रचार सभेत ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली होती. याच टीकेवर बॅनर्जींनी पलटवार केला असून राहुल गांधी अजूनही लहान आहेत, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.
दरम्यान,ममता बॅनर्जी सरकारवर राहुल गांधी यांनी आरोप केले होते कि, ‘ममतांच्या राज्यात विकास झाला नाही ’ या आरोपांबाबत ममता बॅनर्जी यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘राहुल गांधी अजूनही लहान आहेत. मी त्यांच्या आरोपांवर काय बोलणार? तसेच किमान उत्पन्नासंदर्भात काँग्रेसच्या घोषणेवर आम्ही भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले