नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांनी व्यक्त केली होती. लोकसभेच्या शेवटच्या सत्रात नरेंद्र मोदी हेच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत, अशी मनोकामना प्रकट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सर्व भाजप विरोधी पक्ष मुलायम सिंह यादव वर यांच्या वक्त्यव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावर बिहारच्या माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दल ( राजदचे) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी मुलायम सिंह यांच्या वक्तव्यावर आपले मत मांडले आहे. (मुलायम सिंह यादव ) यांचे वय झाले आहे, त्यांना आठवण राहत नाही. केव्हा काय बोलायचे त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केले ते मला महत्वाचे वाटत नाही.