बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणेकरांना चोवीस तास पाणी देण्याकरता पुणे महापालिका जोमाने काम करत असुन लवकरच प्रत्येकांच्या घरी आणि स्वच्छ शुध्द पाणी दिले जाईल. असे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले .
पुणे महापालिकेत आमदार चंद्रकांत पाटील,महापौर मुरलीधर मोहोळ ,भाजपचे सभागृह नेते ,नगरसेवक यांच्या उपस्थितीत आयुक्त विक्रमकुमार यांच्यासोबत शहरातील विविध प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याबैठकीनतंर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.किमान एका क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभागांमध्ये चोवीस तास पाणी दिले जाईल याकरता प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे. अशा सुचना चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला केल्या .शहरातील विविध भागात नाल्याच्या बाजुस संरक्षक भिंत बांधण्याबाबत चर्चा झाली असुन याकरता अनुदान देण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. नाल्यांचे खोलीकरण करुन रुंदीकरण करण्याकडे प्रशासनाला सुचना करण्यात आल्या . पंडित जिंतेंद्र अभिषेकी उदयान सध्या बंद असुन याकरता ज्या नागरिकांची जमीन घेतली गेली. त्यांना त्याचा परतावा देण्याबाबात लवकरच संवाद साधुन लवकरच ते उदयान सुरु होईल. असं चद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यात विविध जिल्हयाच्या नामकरणावरुन जी चर्चा केली जात आहे. त्यामध्ये भाजप कुठेही राजकारण करत नाही असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.