बहुजननामा ऑनलाइन टीम – कोविड हा भारता साठी एक चांगला अनुभव होता. जो बंरच काही शिकवून गेला. सरकार द्वारे ही चांगल्या योजना राबल्या(Dr. Pramod Chaudhary) गेल्या. या मुळे डिझीटल मिडिया ला चांगला प्लैटफॉम भेटला. झूम ऐप, गुगल मिट या सारख्या गोष्टी चा चांगला प्रसार झाला. याचे महत्त्व लोकांना समजले.लॉकडाउन मुळे घरगुती उद्योगांना चालना मिळाली. होम मेड गोष्टी ला पसंती भेटली. लोक दूर असून जवळ आले. हे मत डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 81व्या वर्धापन दिवसा निमित्त प्राज उद्योग समुहा चे एक्झिकेटीव्ह चेयरमन डॉ. प्रमोद चौधरी यांचा वार्तालाप चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ” कोरोना नंतर चे उद्योग विश्व ” या विषयावर ते बोलत होते.
पुढे डॉ. चौधरी म्हणाले कि, पुणे व आसपास च्या परिसरात बर्याच चांगल्या वाईट गोष्टी झाल्या. कोविड चा आधी पासून भारताची घौडदौड चांगली सुरु आहे. वेगवेगळे प्रोजेक्ट राबले जात असुन त्यामुळे भविष्यात उद्योग धंदे चांगले चालतील.
कोविड बरोबर वातावरण बदला चा ही परिणाम उद्योग धंद्या वर होत आहे. तरुणांना नोकरी देणे हेही एक आव्हान आहे. कोविड मुळे मैन्युफैक्चरीगं चा समतोल बिघडला.
लॉकडाउन मुळे उद्योग धंद्यात लेबर चा तुटवडा निर्माण झाला. त्याचप्रमाणे कैश सायकल बिघडली गेली. एमएससीबी सेक्टर ला याचा जास्त फटका बसला. जीडीपी खाली गेला हा मोठा फटका बसला व निर्याती वर ही परिणाम झाला.
प्रगतशील देशाला ही अंदाज न येनारी परिस्थिती कोविड मुळे निर्माण झाली.
यात चांगल्या गोष्टी ही झाल्या त्यात हैंन्ड सैनिटाईजर, पीपी किट, व्हेंटिलेटर, ऑक्सिमीटर आदी गोष्टी ज्या आपण आयात करायचो, त्या गोष्टी आता आपण निर्यात करायला लागलो आहे. हा सकारात्मक बदल झाला आहे. . या सगळ्यांचा फायदा भविष्यात नक्की च होणार.
आत्मनिर्भर भारत अभियान मुळे सर्व लोक स्वावलंबी होत आहेत. हे महत्त्वाचे आहे.
कोविड मुळे लोक आता चायना वस्तू बैन करत आहे. याचा फायदा भारता ने घेतला पाहिजे. कोविड सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये. त्याचप्रमाणे कोविड मुळे प्रदूषण कमी करने व स्वच्छता राखणे ही आव्हाने सर्वांन समोर रहाणार आहे.