पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे आणि पिंपरी- चिंचवड या दोन्ही शहरांची झपाट्याने वाढत होत आहे. त्यात महापालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पुणे शहराच्या गरजा देखील वाढणार आहेत. परंतू, पुण्याचे प्रश्न मार्गी लावताना आता चिंता करायची गरज नाही. कारण राज्याची तिजोरीच पुण्याकडे आहे, अशी मिश्किल टिपण्णी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition in the Legislative Assembly Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
पुणे महापालिकेच्या ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पा’ चा ऑनलाईन लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते. हा सोहळा महापालिकेच्या नवीन इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ , महापालिका आयुक्त विक्रम कुमार , जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुण्याची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. साडे पाच टीएमसी पाण्याची गरज असणाऱ्या पुणे शहराला आता साडेअठरा टीएमसी पाणी लागत आहे. जवळपास दोन लाख एकराला बारा महिने पुरेल एवढे पाणी पुणेकरांना देण्यात येत आहे. त्यात उपकार करत नाही ती शहराची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यावर पुण्याचे आठ आमदार, पंचायती समितीचे प्रतिनिधी सगळे मिळून बैठक घेणार आहोत. कोणताही राजकीय मतभेद निर्माण न करता शहरातील सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत.