बहुजननामा ऑनलाइन टीम – अॅक्टर आणि पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला समर्थन देत आल्यानं चर्चेत येत आहे. आता त्यानं त्या लोकांवर निशाणा साधला आहे ज्यांनी शेतकऱ्यांची पिझ्झा खाल्ल्यामुळं खिल्ली उडवली आहे. अनेकांनी याला पिझ्झा लंगर म्हटलं आणि शेतकऱ्यांच्या पिझ्झा खाण्यावर टीका केली. दिलजीतला यांचं खूप वाईट वाटलं आहे. यावर आता दिलजीतनं भाष्य केलं आहे.
यावर बोलताना दिलजीत म्हणाला, शेतकऱ्यांचं विष घेणं कधीच चिंतेचा विषय ठरला नाही. परंतु शेतकऱ्यांचं पिझ्झा खाणं मात्र मोठी बातमी बनली. लोकांचा याची खूप अडचण होत आहे. दिलजीतनं या संदर्भात ट्विट केलं आहे. सध्या त्याचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
https://twitter.com/diljitdosanjh/status/1338346217781116929?s=20
अलीकडेच आंदोलनकर्त्यांना पिझ्झा वाटण्यात आले. शानबीर सिंह संधुनं आपल्या चार मित्रांसोबत सोबत मिळून ही फीस्ट ऑर्गनाईज केली होती. याबाबत बोलताना त्यानं सांगितलं होतं की, जे शेतकरी पिझ्झा बनवण्याच्या प्रक्रियेत वापरलं जाणारं पीठ पुरवतात त्यांना पिझ्झा खाणं परवडत नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून अॅक्टर आणि सिंगर दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि कंगना यांच्यात यावरून ट्विटरवर घमासान सुरू होतं. या वॉरमुळं दोन्ही सेलेब्स काही दिवसांपासून चर्चेत आहेत.