नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये आपला जनसमूह वाढवण्यासाठी कॉंग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत असून राज्याच्या राजकारणात पाय ठेवण्यासाठी कॉंग्रेस सरचिटणीस आणि पक्षाच्या प्रभारी प्रियांका गांधी दिवस-रात्र काम करत आहेत. कधी त्या सीएएच्या निदर्शकांना भेटण्यासाठी यूपीच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकरी आणि कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करतात. या सगळ्या गोष्टींच्या दरम्यान प्रियंका गांधींची नजर यूपीच्या दलितांवर आहे.
प्रियंका या भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर यांना मेरठला जाऊन भेट असो किंवा रविदास मंदिराला भेट असो, याला दलितांवर डाव मानला जात आहे. प्रियांका यांची राज्यात सतत सक्रियता आणि भीमा आर्मीशी वाढती मैत्री यामुळे बसपा प्रमुख मायावती अस्वस्थ दिसत आहेत.
प्रियांका गांधी यांनी वाराणसीतील संत रविदास यांच्या जन्मस्थळी आयोजित कार्यक्रमात भाग घेत त्या मंदिरात जाऊन पाया पडल्या. नंतर त्यांनी सभा मंडपात जाऊन बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, ‘आज येथे आल्याचा मला फार आनंद झाला. मी जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वांचे स्वागत करते. धन्यवाद करते. रविदास यांच्यासमोर मला डोके टेकवण्याची संधी दिली. माझे सौभाग्य आहे की, कबीर आणि रविदास यांनी सर्वांना एकत्र राहण्याची शिकवण दिली. माणसाला कोणत्याही धर्मात विभागले जाऊ नये. त्यामध्ये फक्त माणूसच दिसला पाहिजे, रविदासजी या विचारसरणीचे होते. ही विचारसरणी ही या भारताचा पाया आहे. आज आपण सर्वांनी त्यांच्या बोलण्यानुसार वागण्याची गरज आहे.’
वाराणसीचे रविदास मंदिर अलीकडच्या काळात राजकारणाचे नवीन केंद्र बनले असून ९० च्या दशकात या मंदिरात फक्त बसपाचे नेते आले आणि गेले. पण २०१४ पासून परिस्थिती बदलली असून बसपा नेत्यांव्यतिरिक्त आता राजकारणातील मोठे चेहरेही इथे दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, योगी आदित्यनाथ या नेत्यांनीही रविदास मंदिरात नमन केले आहे.
आता यात कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचेही नाव जोडले गेले आहे.प्रियांका यांच्या वाराणसी भेटीदरम्यान भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर हेही दिसले असून
प्रियांका यांच्या रविदासच्या मंदिरात जाण्यावरून बसपा सर्वेसर्वा मायावती यांनी निशाणा साधत, ‘कॉंग्रेस, भाजपा आणि अन्य पक्ष संत गुरू रविदासजींचा उत्तर प्रदेशातल्या आपली सत्ता असतानाही त्यांचा आदर करत नाहीत. परंतु नंतर सत्ता गेल्यावर स्वार्थासाठी ते त्यांच्या मंदिरात जातात आणि नाना प्रकारची नाटक करतात. त्यांच्यापासून सावध राहा. बसपा हा एकमेव पक्ष आहे ज्याने सरकारच्या काळात विविध स्तरांवर त्यांना सर्वांना आदर दिला होता. त्याला आता विरोधी पक्ष एक-एक करून समाप्त होऊ लागले आहेत, जे अत्यंत निंदनीय आहे.’
काही वर्षांत उत्तर प्रदेशात दलितांना बसपाबद्दल मोहभंग झाला असून दलितांचा मोठा वर्ग आता मायावतींकडे नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा गट भाजपबरोबर दिसला होता. ज्या पद्धतीने दलित कायद्यात दुरुस्ती करण्यात आली, हा वर्ग भाजपकडे वळत आहे. याच दलित समाजावर प्रियंका गांधींची नजर आहे.