मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कॉंग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम आहे असं म्हणत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. कॉग्रेसच्या आडमुठ्या धोरणामुळे लोकसभेत आघाडी होऊ शकली नाही. विधानसभेला पत्रव्यवहारापलिकडे काहीच होत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी भाजपची ‘बी’ टीम कशी ? याचा खुलासा केल्याशिवाय कॉंग्रेससोबत बोलणी होणार नाही असं मत अड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.
प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी ही महाआघाडीमध्ये सामील होणार याची चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. कॉंग्रेसने आडमुठी भूमिका घेतल्याने ते घडू शकले नाही. परंतु लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसने वंचितला भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला. या आरोपामुळे वंचितची बदनामी करण्याचा डाव कॉंग्रेसचा असल्याचं दिसत आहे. लोकसभेत पत्रव्यवहाराशिवाय काही झाले नाही. आताही फक्त पत्रव्यवहार होत आहेत. पत्रव्यवहारापलिकडे काहीही होताना दिसत नाही. आम्ही कॉंग्रेससोबत जाणार नाही अशी टोकाची भूमिका अजूनतरी घेतली नाही. त्यामुळे कॉंग्रेसने यावर काहीतरी बोलावं किंवा हा विषय थांबवावा. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष हे दोघेही इन्क्वायरीखाली आहेत. त्यांनी वंचितला बदनाम करण्याचा त्यांचा विचार दिसतो. त्यासोबतच आम्ही बोलायला तयार आहोत. परंतु वंचितच आडमुठी भूमिका घेत आहे. असं चित्र उभं केलं गेलं. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे. त्याचा खुलासा आम्ही मागितला होता. परंतु तो अद्याप पर्यंत केला गेला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम कशी याचा खुलासा केल्याशिवाय पुढची बोलणी केली जाणार नाही. असंही ते म्हणाले.
पक्षांतरावर बोलताना ते म्हणाले, आयाराम गयाराम हा प्रकार नवा आहे असं मी मानत नाही. पक्षांना यामुळे फरक पडत नाही. असं ते म्हणाले.
कॉंग्रेस राष्ट्रवादीतील आमदार वंचितच्या संपर्कात आहेत. त्यांना पक्षात घेणार का यावर बोलताना ते म्हणाले की कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. परंतु आम्ही अजून आमदार पुन्हा संधी द्यावी असा आमचा निर्णय झाला नाही. तर नवीन लोकांनाच संधी द्यावी असा आमचा मानस आहे. कोणी आमच्या संपर्कात आहेत. हे सांगून कोणत्याही राजकिय पक्षांना डिस्टर्ब करू इच्छित नाही. असंही ते म्हणाले.