नवी दिल्ली : वृत्तसंस्था- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुकानदार, किरकोळ विक्रेते आणि स्वत:चा व्यापार करणाऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु केली आहे. या योजनेचं नाव प्रधानमंत्री लघु व्यापारीक मानधन योजना ठेवण्यात आलं आहे. या योजनेची सुरुवात आज केंद्र सरकार करणार आहे. या योजनेजा फायदा वयाच्या 60 व्या वर्षानंतर आर्थिक मजबूत देण्यासाठी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडची राजधानी रांचीमध्ये ही योजना लाँच केली. या योजनेत दुकानदार, किरकोळ विक्रेता आणि स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना प्रत्येक महिना किमान 3000 रुपये पेन्शन दिली जाईल. याचा फायदा जवळपास 3 कोटी किरकोळ विक्रेता, दुकानदार आणि स्वयंरोजगारवाल्यांना होणार आहे. पुढील 3 वर्षात या योजनेअंतर्गत 5 कोटी दुकानदारांना जोडण्याचं ध्येय आहे.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं ?
वर्षाला दीड कोटींपेक्षा कमीचा व्यापार करणारे सर्व दुकानदार, स्वत:चा व्यवसाय करणारे आणि किरकोळ विक्रेते ज्यांचं वय 18 ते 40 वर्ष दरम्यान आहे ते सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
देश के करोड़ों व्यापारियों और स्व-रोजगारियों के लिए राष्ट्रीय पेंशन योजना की शुरुआत भी झारखंड से हो रही है।: PM
— PMO India (@PMOIndia) September 12, 2019
कसं कराल रजिस्ट्रेशन ?
पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कॉमन सर्व्हीस सेंटरला जाऊन तेथे रजिस्ट्रेशन करू शकता. या पेन्शन योजनेत सरकारचेही समान योगदान असणार आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी नियमही अगदी सुलभ करण्यात आले आहेत. खास बात अशी की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार नंबर आणि बँक खात्याव्यतिरीक्त इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही.