नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने शेतकर्यांची मोठी समस्या सोडविली आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पिकाच्या नुकसानाचे मूल्यांकन आता उपग्रहाद्वारे केले जाईल. याद्वारे स्मार्ट सॅम्पलिंग होईल. यामुळे पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांना विम्याच्या दाव्याचे भुगतान लवकर होईल. पायलट प्रोजेक्ट म्हणून देशातील १० राज्यांमधील ९६ जिल्ह्यात हा प्रकल्प सुरू झाला आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
यावर्षी योजनेनुसार (PMFBY ) फक्त धान पिकांचे नमुने घेण्यात येत असल्याचे तोमर यांनी सांगितले. इतर राज्यांच्या इतर पिकांचा देखील रबी पीक हंगामात समावेश असेल. या तंत्राने पिकाच्या उत्पन्नाचा योग्य अंदाज लावला जाऊ शकतो. ज्याद्वारे लवकरच विमा हप्त्यांचे पेमेंट शेतकऱ्यांना मिळेल. परंतु, प्रकल्प योग्य पद्धतीने राबविण्यासाठी कृषी विभागातील कर्मचारी शेतात जाऊन देखरेख ठेवतील.
कसा मिळवायचा फायदा ?
१) पेरणीच्या दहा दिवसांतच शेतकऱ्याला PMFBY अर्ज भरावा लागतो.
२) एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल तरच विम्याचा लाभ देण्यात येईल.
३) पेरणी दरम्यान उभे असलेल्या पिकांना नैसर्गिक आपत्ती, रोग व कीटकांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई.
४) स्थानिक आपत्ती, गारपीट, भूस्खलन, ढगफुटी, वीज पडून उभे पिकामुळे होणारे नुकसान भरपाई.
५) हंगामानंतर, अवकाळी चक्रीवादळ पाऊस, गारपीट आणि वादळाच्या नुकसानीमुळे पुढील १४ दिवस शेतात कोरडे राहिल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी करेल.
६) प्रतिकूल हवामानामुळे पिकाची पेरणी करता नाही आली तरी आपण या योजनेचा लाभ घेता येईल.
प्रीमियम संदर्भात :
१) खरीप पिकासाठी २ टक्के आणि रब्बी पिकासाठी १.५ टक्के प्रीमियम भरणे आवश्यक आहे.
२) PMFBY योजना व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात शेतकऱ्यांना ५ टक्के प्रीमियम भरावा लागतो.
या कागदपत्रांची आवश्यकता :
१) शेतकर्याचा फोटो, ओळखपत्र, पत्ता पुरावा, शेत
२) खसरा नंबर, शेतातील पिकाचा पुरावा
Visit : bahujannama.com