नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या भाषणादरम्यान महात्मा गांधीजींच्या नावाने भाषणाला सुरुवात केली. यावेळी बोलताना जसे पंतप्रधानांनी भारताने प्लास्टिक वापरावर बंदी घातल्याचे सांगितले, यावेळी जसा मोदींनी प्लास्टिक बंदीचा उच्चार केला तसा संपूर्ण UNGA मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. पंतप्रधान म्हणले, अध्यक्ष महोदय मी ज्यावेळी इकडे येत होतो त्यावेळी यु एन भवनावर लिहिलेले पहिले की,’नो मोर सिंगल युज प्लास्टिक’. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज पूर्ण भारत प्लास्टिक बंदीसाठी एक अभियान चालवत आहे. एवढे म्हणताच संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. यामुळे नरेंद्र मोदींना भाषणात थोडे थांबावे लागले.
LIVE: PM Shri @narendramodi's address to the UNGA. #PMModiAtUN https://t.co/195AOHyohw
— BJP (@BJP4India) September 27, 2019
येणाऱ्या पाच वर्षांमध्ये आम्ही पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच १५ कोटी घरांना पाण्याचा सप्लाय करून जोडले जाणार आहे. जेव्हा २०२२ मध्ये भारत आपल्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करेल तेव्हा आम्ही दोन कोटी गरीब लोकांसाठी घरे बांधणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच आमच्या देशाची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे आणि ही एक मोठी परंपरा आहे.
जेव्हा एखादा देश जगातील सगळ्यात मोठी हेल्थ इन्शोरन्स स्कीम एकदम यशस्वीरीत्या राबवतो, ५० कोटी लोकांना ५ लाखांपर्यंतची उपचारासाठी फ्री मदत देतो तेव्हा त्यासोबत बनलेली एक संवेदनशील भावना संपूर्ण जगाला मार्ग दाखवते. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास ही आमची प्रेरणा आहे.आम्ही जे लक्ष डोळ्यसमोर ठेऊन काम करत आहोत तेच सर्व विश्वभरात होत आहे. कारण हेच स्वप्न अनेक देशांचं आहे अनेक समाजाचं आहे आणि जगाचे सुद्धा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले.
Visit : bahujannama.com