बहुजननामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी सोमवारी (दि. 7) जनतेशी संवाद साधताना 21 जूनपासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस देणार असल्याची घोषणा केली. दरम्यान काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला लसीकरणाविषयीचा संपूर्ण तपशील न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले होते.
ज़िंदा लाशों से तो अच्छी थीं वो तैरती लाशें,
जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई।#JusticeChandrachud— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 8, 2021
न्यायालयाने केंद्राच्या लसीकरणाच्या मोहिमेवर परखड शब्दांत ताशेरे ओढले होते.
या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारवर एका शेरच्या माध्यमातून सूचक शब्दांत निशाणा साधला आहे.
तसेच या ट्विटमध्ये त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना देखील हॅशटॅग केले आहे.
आव्हाडांनी एक शेर ट्वीट केला आहे.
जिंदा लाशों से तो अच्छी थी वो तैरती लाशें, जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई | #JusticeChandrachud”, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील गंगा नदीकिनारी शेकडो मृतदेह सापडले होते. जितेंद्र आव्हाडांचा या शेरमधील रोख त्याच दिशेने असल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशात बलिया, गाझियाबाद यासह गंगेच्या काठावर असलेल्या विविध घाटांच्या ठिकाणी मृतदेह वाहून येत असल्याचे निदर्शनास आले होते. यावरून मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील सरकारवर टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह बाहेर काढण्याचे आणि नदीत मृतदेह टाकले जाणार नाही, यासाठी खबरदारी घ्यायला सुरुवात केली होती. तसेच न्यायालयाने देखील उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांना हे मृतदेह तात्काळ हटवण्याचे आदेश दिले होते.
कृपया हे देखील वाचा:
‘आपल्याकडे प्रथा पडलीये, ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं’, CM ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर फडणवीसांचा खोचक टोला (व्हिडीओ)
पीएम मोदी अन् मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
डोकेदुखीच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या