नवी दिल्ली: वृत्तसंस्था – दिल्लीमध्ये कोरोना चा अनियंत्रित वेग पाहता सोमवारी रात्रीपासून आठवड्याभराचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज दुपारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. फक्त घोषणा होण्याची वाट होती तोपर्यंत दारूच्या दुकानावर लोकांची गर्दी जमा झाली. प्रत्येकजण एकाच शर्यतीत होता की कोणत्या ना कोणत्या मार्गाने जास्त बाटल्या मिळाल्या पाहिजेत.
गर्दी इतकी वाढली की कोरोनाचे नियमही दूर राहिले, लोक सामाजिक अंतर विसरले. कोरोनाचा वेग वाढता असूनही, कोरोना मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवले गेल्याचे दिसले. गोल मार्केट परिसरात गर्दी इतकी वाढली की पोलिसांना क्राउड मॅनेजमेंट करावा लागला. लॉकडाउनची घोषणा करताना केजीरीवाल म्हणाले की अत्यावश्यक सेवा, खाद्यपदार्थ आणि मेडिकल सेवा चालू असतील. लग्न समारंभामध्ये ५० लोकांना एकत्र येण्याची परवानगी आहे. यासाठी वेगळे पास दिले जातील.
राजधानीमध्ये असलेल्या कोरोना परिस्थितीवर ते म्हणाले की एक लाख चाचण्या दिल्लीमध्ये रोज होत आहेत. ते पुढे म्हणाले की आम्ही चाचणी आणि मृत्यांची संख्या लपवली नाही. केजरीवाल म्हणाले की दिल्ली आरोग्य विभाग कोलॅप्स होण्याच्या मार्गावर पोहचली आहे. जर ही डळमळली तर खूप मोठी समस्या निर्माण होईल.
केजरीवाल म्हणाले की गेल्या २४ तासांमध्ये जवळ जवळ २३,५०० कोरोना प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या तीन- चार दिवसांत दररोज जवळ जवळ २५ हजार केसेस मिळाल्या आहेत. पॉजिटीव्ह रेट आणि इन्फेक्शन वाढले आहे. जर एका दिवसात इतके रुग्ण मिळतील तर पूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल. बेडची कमतरता भासू शकते.