मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या तडफदार भाषणनाने सभा गाजवत असतात, यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही हे आपल्या १०४ उमेदवारांसह निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते राज्यभर सभा घेत आहेत, आपल्या पहिल्या सभेतच त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेला १२४ जागांसाठी कराव्या लागलेल्या तडजोडी संदर्भात त्यांनी राज यांनी विधान केलं होत. तसेच मी सत्ता मागायला नाही तर प्रबळ विरोधी पक्षाची जबाबदारी मागायला आलो आहे , असेही राज यांनी म्हंटले आहे. परंतु राज यांचा पक्ष विरोधी पक्ष म्हणून येणे अशक्य आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.
राज यांची हवा मोठ्या सभांत असते, त्यामुळे मीडियावाले देखील त्यांना लाईव्ह दाखवतात, आणि त्यांच्या सभांनादेखील गर्दी होत असते. राज यांचे विरोधी पक्ष म्हणून निवडून येण्याचं विधान बरोबर आहे. परंतु राज यांच्याकडे तेवढं संख्याबळ नसल्याने त्यांचे विरोधी पक्ष म्ह्णून येण्याची शक्यता कमी आहे. असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच जनता राज यांचे भाषण ऐकायला येते परंतु प्रत्यक्षात मतदान आम्हाला देते, त्यामुळे राज यांचा पक्ष विरोधी पक्ष म्हणून येणार नाही तर त्याऐवजी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच विरोधी पक्ष म्हणून येईल असेही, रामदास आठवले यांनी म्हण्टले आहे.
दरम्यान राज यांनी आपल्या पहिल्या सभेत म्हंटले होते कि, राज्याला सध्या एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष जर प्रबळ असला तर सत्तेतील आमदार काही करू शकणार नाही. सत्ताधारी पक्षांना जाब विचारण्यासाठी तसेच नागरिकांचा आवाज उठविण्यासाठी एक मजबूत विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे, त्यामुळे मी सत्तेसाठी आलो नसून विरोधी पक्षाच्या भूमिकेसाठी आलो असल्याचे राज यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com