मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पालघरमध्ये साधुंची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला. साधूंच्या हत्या प्रकरणी कोणताही धार्मिक पैलू नसल्याचं पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटलं आहे. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघीड सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
भातखळकर यांनी एका इंग्रजी पेपरचे कात्रण ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. भातखळकर म्हणाले, भगव्याला विरोध करणारे दोन पक्ष आणि भगव्याला गुंडाळून ठेवणारा तिसरा पक्ष सत्तेत असल्यामुळे ठेचून मारलेल्या भगव्या वेशातल्या साधुंना न्याय मिळेल तरी कसा ? असा खोचक सवाल भातखळकर यांनी केला आहे. आमदार भातखळकर यांनी ट्विट करून या प्रकरणी प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात झालेल्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्यप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. साधू आणि त्यांच्या चालकाची निर्घृण हत्या झाली होती. निर्जण आणि दुर्गम परिसरात हे गाव आहे. घटना घडताच आपले एसपी तिथे पोहचले. 16 फेब्रुवारीला ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपींना अटक केली. मुख्य पाच आरोपी तुरुंगात आहेत. या प्रकरणातील कोणालाच सोडणार नाही. कोणी आग लावण्याचा प्रयत्न करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.