बहुजननामा ऑनलाइन – जम्मू – काश्मीर च्या कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तान ला खूप मोठा धक्का बसला आहे. त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी अनेक देशांची मदत मागितली , परंतु कोणीही मदतीचा हाथ पुढे केला नाही . यामुळे पाकिस्तान बिथरले आहे ! पाकिस्तान ने भारताबरोबरचे व्यपारी संबंध बंद केले आहे. आता पाकिस्तान नाही कोणती वस्तू भारताकडून विकत घेऊ शकेल , नाही भारत पाकिस्तान ला कोणती वस्तू विकेल , परंतु यामुळे भारताचे नाही तर पाकिस्तान चे नुकसान होणार आहे.
दरम्यान , आपल्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टींसाठी पाकिस्तान भारतावर जास्त प्रमाणात अवलंबून आहे. पाकिस्तान कांदा , टोमॅटो सारख्या वस्तूंसाठी भारतावर अवलंबून असते. त्यामुळे पाकिस्तान ने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. पाकिस्तान मध्ये आता टोमॅटो आणि कांद्याची कमतरता भासणार आहे.
एवढेच नव्हे तर पाकिस्तान ने ३७० हटविण्याच्या विरोधात एअरस्पेससंदर्भात सुद्धा काही नियम राखून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गुरुवारी एअरस्पेस च्या एक कॉरिडॉर ला बंद केले आहे. इम्रान खान ने काश्मीर च्या मुद्द्यावर घेतलेल्या निर्णयाच्या नंतर याविषयावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलवली , आणि खूप निर्णय मांडले. पाकिस्तानला इतका धक्का बसला आहे कि , इम्रान ने मंगळवारी पाकिस्तान च्या संसदेत काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली. आणि भारतावर हल्ला करण्याबाबत मत मांडले.
पाकिस्तान सध्या भीषण गरिबीला सामोरे जात आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत द्व्यारे दिला गेलेला ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’ चा दर्जा काढून घेतल्यानं , त्याची निर्यात पहिल्या पेक्षाही खाली आली आहे. भारताने कलम ३७० हटविण्याच्या आणि जम्मू- काश्मीर ची पुनर्र्चना करण्याबाबत घेतलेल्या निर्णयांनंतर पाकिस्तान ने याला विरोध केला आहे.