नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमसंबंधी कलम ३७० रद्द केल्यानंतर चवताळलेल्या कुरापती पाकिस्तानने आता आणखी एक मोठा निर्णय़ घेतला आहे. पाकिस्तानात भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यास आणि दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानचे सुचना प्रसारण मंत्री फिरदौस आशिक अवान यांनी ही माहिती दिली.
"No Indian movie to be screened in Pakistani cinemas," says Dr Firdous Ashiq Awan, Special Assistant to Pakistan Prime Minister on I&B: Geo English pic.twitter.com/Jw3zwifKdb
— ANI (@ANI) August 8, 2019
भारत सरकारने जम्मू काश्मीरबाबत घेतलेल्या या निर्णयानंतर पाकिस्तान सरकारची भंबेरी उडाली आहे. जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांमध्ये जाणार असल्याची घोषणा इम्रान खान यांनी केली होती.
कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे राजकिय आणि व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर समझौता एक्सप्रेसदेखील पाकिस्तानने रद्द केली आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्रात देखील बदल केले आहेत. यामुळे पाकिस्तानमधून प्रवास करणाऱ्या विमानांवर बंधने आली आहेत. आता यानंतर कुरापती पाकिस्तानने पाकिस्तानात भारतीय सिनेमे दाखवण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.