बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतासोबतचा सिंधू जल करारावर आणि भारताशी संबंधित विवादांवर चर्चे करण्यासाठी पाकिस्तानचे उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ रविवारी अमेरिकेला रवाना झाले आहे.
पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, सिंधु जल आयुक्त सय्यद मेहर अली शाह यांच्या नेतृत्वात अमेरिकेचे शिष्टमंडळ चर्चेदरम्यान 1960 च्या कराराची पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्यावर जोर देणार आहे.
पाकचे हे प्रतिनिधीमंडळ पाच दिवस अमेरिकेत राहणार आहे. याचदरम्यान हे मंडळ भारताच्या किसनगंज आणि रातले या दोन उर्जा प्रकल्पांसंबधी आपल्या शंकांचे निवारण करण्यासाठी समिती गठीत करण्याची मागणी करणार आहे.
भारताने निर्माण केलेल्या 330 मेगावॅटच्या किसनगंज आणि 850 मेगावॅट रातले या दोन उर्जा प्रकल्पांवर पाकिस्तानचा आक्षेप आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यापुर्वी हे पाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय पाकीस्तानला मिळत होते. या प्रकल्पामध्ये उर्जा संयंत्र हे कराराच्या विरोधात आहेत.
भारत-पाकिस्तानमध्ये तीव्र तणाव वाढवल्यानंतर भारताने आपल्या वाट्याचे पाणी पाकिस्तानकडे जाऊ न देण्याची सुरवात केली आहे. पूर्वी हे पाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय पाकिस्तानला जायचे.