बहुजननामा ऑनलाईन – जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हे जम्मू-काश्मीरमधून रद्द केले आहे. हे पाकिस्तानच्या जास्तच जिव्हारी लागले आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबतचे राजकीय संबंध सुद्धा डाऊनग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (एनएससी) बैठकीनंतर पाकिस्तानने भारताशी द्विपक्षीय व्यापारावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. व पाकिस्तानने भारताशी असलेले आपले सर्व व्यापारी संबंध तोडले आहेत.
त्याचबरोबर आता पाकिस्तान भारताशी द्विपक्षीय करारांचा आढावा घेणार आहे. एवढेच नाही तर काश्मीर प्रकरण यूएनकडे नेण्याची धमकीही पाकिस्तानने दिली आहे. याशिवाय पाकिस्तान भारताचे राजदूतही परत पाठवणार आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानमध्ये खूप मोठा संताप निर्माण झाल्याने पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे समजते.
त्यामुळे आता भारताचे पाकिस्तानसोबत जे राजनैतिक संबंध होते ते आता पाकिस्तानने कमी केले आहेत. तसेच पाकिस्तानने भारताशी द्विपक्षीय व्यापारावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.