नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – नागपूर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असतानाही कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर कुठेच दिसत नव्हते. त्यामुळे ते हरवले असल्याच्या पोस्ट सोशल मडियावर फिरत होत्या. त्यातच एकाने त्यांना श्रद्धांजली सुद्दा अर्पण केली. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना चांगलीच संधी मिळाली. ही पोस्ट संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाल्याने चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे चिडलेल्या आमदार सावरकररांनी थेट वाठोडा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. बेड्स, ऑक्सिजन तसेच रेमडेसिव्हिरचा तुटवडा झाल्याने जनता हतबल झाली आहे आहे. अशा परिस्थितीत कामठीचे आमदार सावरकर काहीच मदत करीत नाहीत. तसेच तक्रारीची दखल घेत नसल्याने नाराजी आहे. त्यामुळे एका संतप्त नागरिकाने आमदार सावरकर हरवले असल्याची पोस्ट टाकली. यात एकाने व्हाट्ॲपवर चक्क आमदाराला श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे आमदार चांगलेच संतापले अन् त्यांनी थेट पोस्ट टाकणा-या विरोधात वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान पक्षाला बदनाम करण्यासाठी हा विरोधकांचा डाव असल्याचे आमदार सावरकर यांनी म्हटले आहे.