बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाचे अपयश समोर आल्याने आणि मेट्रो कारशेडचं पितळ उघड केल्याने सरकारमध्ये(Opposition leader Darekar) पोटशूळ निर्माण झाला व त्यातूनच जलयुक्त शिवार योजनेवर अविश्वास दाखविण्यात आला. मेट्रो कारशेड बाबत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला(Opposition leader Darekar) उघडे पाडले, त्याचे उत्तर सरकारला देता आले नाही. म्हणूनच राजकीय अभिनिवेशनातून चौकशीचा निर्णय घेण्यात आल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे ही योजना बदनाम करून खानदेश विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळविण्याचा डाव आहे. योजनेची चौकशी जरूर करा, पण यानिमित्ताने विदर्भ मराठवाड्याचा निधी इतरत्र वळवू नका, असे दरेकर म्हणाले.
“जलयुक्त शिवार हा कोरडवाहु शेतकऱ्यांसाठी राबवलेला उपक्रम आहे. यापूर्वीही यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असता न्यायालयानेही योजना चांगली असल्याचे नमूद केले आहे. ही चौकशी म्हणजे या योजनेची बदनामी करून विदर्भ, मराठवाडा व खानदेशाचा हक्काचा निधी इतरत्र वळवण्याचा डाव आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.
कॅग ने योजनेत आर्थिक अनियमितता झाल्याचे कोठेही म्हटले नाही. शेतकऱ्यांना दुबार पिके घेता आली आणि हजारो गावे या योजनेमुळे टँकरमुक्त झाली, हे स्पष्टपणे अहवालात म्हटलेले आहे, तरीही राजकीय आकसापोटी ही चैाकशी करण्यात येत असल्याचे दरेकर यांनी म्हटलं आहे.