आडुळ : बहुजननामा ऑनलाईन – रविवारी रात्री औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला हूल दिल्याने दुचाकी रोड वरून घसरली आणि अपघात झाला. या अपघातात १ जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर माहिती अशी कि, रविवारी रात्री रजापूर गावाकडून औरंगाबाद शहराकडे चिकलठाणा येथील सोनू महादेव मगरे, गणेश अशोक मगरे व ब्रिजवाडी येथील करण श्रीराम नरवडे हे तिघेजण दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होते. जेव्हा हे तिघेजण आडूळ शिवारात बायपासवर येताच एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला हूल दिल्यामुळे त्यांची दुचाकी घसरून त्यांचा अपघात झाला.
यामध्ये सोनू महादेव मगरे हा जागीच ठार झाला तर गणेश मगरे व करण नरवडे हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाचोड पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.