बहुजननामा ऑनलाईन – हवामान खात्याने गेल्या दोन दिवसांपासून अनेकदा पूर जन्य परिस्थितीचे आवाहन दिले होते. त्याचबरोबर ज्या भागात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला होता तिथे काहीच पाऊस झाला नाही. यामुळे आता हवामान खात्याविरोधात अफवा पसरविणायचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
५ ऑगस्ट रोजी पावसाचा इशारा दिल्याने आम्हाला कार्यक्रम रद्द करावा लागला. मात्र पाऊस काय पडला नाही. हवामान खात्यात नेमके कोण बसले आहे काय माहित अशी टीका राज ठाकरे यांनी हवामान खात्यावर केले आहे. यानंतर त्यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका करत बोलत होते, राज्यात कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर आला आहे. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने फिरत आहे. त्याचा हेलिकॉप्टर काय खाली येत नाही. तर दुसरीकडे गिरीश महाजन सेल्फी घेण्यात व्यस्त आहेत. यावर हे कळते की या लोकांना लाज आणि चिंता काहीच नाही. कारण काहीही होऊ दे तरीही हेच निवडून येतील हे त्यांना ठाऊक आहे अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
एका भाजप नेत्यांनी सांगितले होते की सर्व विरोधी पक्ष जरी एकत्र आले तरी आम्हीच विजयी होणार. कसे काय ? असे विचारले असता त्या नेत्यांनी सांगितले विरोधी पक्षांकडे यंत्र नाही. असा खुलाही यावेळी राज ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी कलाम ३७० रद्द करण्यावरही प्रतिक्रिया दिली. कलम ३७० हटवल्यानंतर सगळ्यांनी पेढे वाटले. पण महाराष्टाबाबत असणाऱ्या कलाम ३७१ वर कोणी का बोलत नाही. आतंकवादी विरोधी कायद्यात सुधार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत कोणावरही जराही संशय आला तरी त्या व्यक्तीला आतंकवादी म्हणून घोषित करण्यात येईल. हा अधिकार कोणाला मिळाला आहे. अमित शहांना का. जर उद्या कोणालाही तुरुंगात टाकतील मग त्या व्यक्तीने स्वतःला सिद्ध करण्यासाठी खटला लढवत बसवावा का. असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.