पुरंदरेंना पुरस्कारावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन शिवप्रेमींच्या जखमेवर या सरकारने मीठ चोळले आहे. अरे महाराष्ट्र पेटवणार शिवसन्मान जागर परिषदा घेऊन, लोकांच्या मनात आग पेटली पाहिजे असे ट्विट करून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्याच्या केंदाच्या निर्णयाचा निषेध केला आहे. त्यांनी काल रात्री उशीरा ट्विट करून इशारा दिला आहे. त्यासोबत त्यांनी एक व्हीडीओही शेअर केला आहे.
शिवद्रोही ब.मो.पुरंदरे ना पदमविभुषण जाहिर…. छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट … महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसतयं….
अरे महाराष्ट्र पेटवणार शिवसन्मान जागर परिषदा घेऊन लोकांच्या मनात हृदयात आग लागली पाहिजे त्याला पेटेवणे म्हणतात. मागच्या परिषदेने आग लावली होतीच. शनिवार वाड्यावर होणारा कार्येक्रम राजभावनात बंद खोलीत उरकावा लागला होता वस्तू पेटली की आग विजवता येते. मन पेटले की विजवता येत नाही.
हा पुरस्कार जाहीर झाल्यावर आव्हाड यांनी काल रात्रीच ट्विट करून महाराष्ट्र पेटवण्याचा इशारा दिला आहे. शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन शिवप्रेमींच्या जखमेवर या सरकारने मीठ चोळले आहे असा दावाही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये केला आहे.
पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार 2015 मध्ये राज्य सरकारच्यावतीने देण्यात आला. त्यावेळी देखील आव्हाड यांनी या पुरस्काराला तीव्र विरोध केला होता. आव्हाड यांच्याबरोबरीने त्यावेळी संभाजी ब्रिगेडनेही पुरंदरे यांच्या पुरस्काराला विरोध केला होता. आता पुन्हा एकदा आव्हाड यांनी पुरंदरे यांच्या विरोधात वातावरण निर्मिती सुरू केली आहे.
ब.मो.पुरंदरेंना पडमविभूषण हा शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळण्याचा धंदा …शिव विचारांनी महाराष्ट्र पेटवणार …. pic.twitter.com/QbinKjENo8
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 26, 2019