नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एटीएम वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. जर आपण एटीएम वापरत असाल तर काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा संपूर्ण आयुष्याची कमाई काही सेकंदातच गायब होऊ शकते. कारण उत्तर कोरिया मालवेअर (व्हायरस) च्या माध्यमातून भारतातील एटीएम वापरणार्या लोकांचा डेटा चोरत आहे.
कॅस्परस्काई ग्लोबल रिसर्च अँड अॅनालिसिस टीमच्या सुरक्षा संशोधक कॉन्स्टँटिन झायकोव्ह यांनी या मालवेयरविषयी माहिती दिली आहे. जयकोव्हच्या म्हणण्यानुसार भारतीय एटीएम ग्राहकांवर हा मालवेअर हल्ला लाजारस ग्रुप करत आहे. पैसा चोरी करणं हा या गटाचा हेतू आहे. २०१४ मध्ये लाझारस ग्रुपसंदर्भात पहिल्यांदा माहिती मिळाली होती. जेव्हा या गटाने सोनी पिक्चर्स एंटरटेन्मेंटवर मालवेयर हल्ला केला. २०१६ मध्ये याच गटाने अमेरिका आणि ब्रिटनसह बर्याच देशांमध्ये रैंसमवेयर हल्ला केला होता.
कॅस्परस्की संशोधकांनी एटीएम ट्रॅक मालवेयर शोधला आहे. हे एक बँकिंग मालवेयर आहे. २०१८ पासून हे मालवेयर भारतीय एटीएम वापरकर्त्यांसाठी लक्ष्य करीत आहे. सुरक्षा संशोधक पथकाचे म्हणणे आहे की, मालवेयर एटीएम कार्डमध्ये लावले गेले आहे आणि नंतर ते कार्ड आणि पिन माहिती रेकॉर्ड करते. त्यानंतर, मिळालेल्या डेटाच्या आधारे, आपल्या बँक खात्यातून पैसे कमावतात. हे मालवेयर इतके धोकादायक आहे की, आपण एटीएममध्ये कोणता पिन घातला आहे हे देखील ते सांगू शकते. याशिवाय हे मालवेअर दूरस्थपणे देखील कार्य करते, म्हणजे दूर बसलेला हॅकर आपल एटीएम नियंत्रित करू शकतो.
Visit : bahujannama.com