बहुजननामा ऑनलाईन : वाहन क्षेत्रातील मंदीमुळे देशातील वाहन उद्योगाला गेल्या २१ वर्षातील सर्वात कमी विक्रीचा सामना करावा लागत आहेत आणि १९९७-९८ नंतरच्या ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी विक्री नोंदवली गेली आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऑटो उद्योगातील मंदीबाबत सरकारच्या वतीने स्पष्टीकरण दिले आहे. निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, ऑटो-मोबाईल उद्योग बीएस ६ स्टैंडर्ड आणि मिलेनियल्सच्या माईंड सेटने ऑटो क्षेत्र सर्वाधिक प्रभावित आहे. सीतारमण यांच्या म्हणण्यानुसार, हल्ली हजारो लोक कार खरेदी करण्याऐवजी ओला-उबेरला महत्त्व देत आहेत.
अशाप्रकारे, अर्थमंत्र्यांनी ऑटो सेक्टरच्या घसरणीसाठी लोकांच्या मानसिकतेतील बदल आणि बीएस -६ मॉडेलला जबाबदार धरले आहे. अर्थमंत्री म्हणाले की, बीएस -६ चळवळ, नोंदणी फी आणि लोकांच्या मानसिकतेशी संबंधित ऑटोमोबाईल क्षेत्राच्या स्थितीसाठी बरेच घटक जबाबदार आहेत. चेन्नईमध्ये निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आजकाल लोक कार खरेदी आणि ईएमआय भरण्यापेक्षा ओला-उबेरला मधून जाणे पसंत करतात. दरम्यान त्यांनी कबूल केले की वाहन क्षेत्र वाईट अवस्थेतून जात आहे आणि लवकरच यावर तोडगा निघाला पाहिजे. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील १०० दिवस पूर्ण होण्याच्या निमित्ताने चेन्नई येथे पत्रकार परिषदेत अर्थमंत्र्यांनी बोलत होत्या.
या व्यतिरिक्त अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सरकार सर्व क्षेत्रांच्या समस्यांबाबत गंभीर आहे . यासाठी अर्थपूर्ण पावले उचलली जात असून पुढे देखील अशीच पावले उचलली जातील. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दोन मोठ्या घोषणा केल्या आणि भविष्यात गरज भासल्यास अधिक घोषणा केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे वाहन क्षेत्रातील मंदीमुळे देशांतर्गत बाजारात ऑगस्टमध्ये वाहन विक्रीत २३.५५ टक्क्यांनी घट झाली. याआधी अशी घसरण डिसेंबर २००० मध्ये झाली होती, ज्यात विक्रीत २१. ८१ टक्क्यांनी घट झाली होती.
Finance Minister Nirmala Sitharaman: Automobile industry is now affected by BS6 and the mindsets of millennial, who now prefer to have Ola or Uber rather than committing to buying an automobile pic.twitter.com/6KEecyopH3
— ANI (@ANI) September 10, 2019