बहुजननामा ऑनलाईन टीम : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी बाकड्यावर असणाऱ्या भाजप सरकारने ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे . माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकास्त्र डांगले आहे. मात्र यावेळी निलेश राणे यांच्या टीकेची पातळी घसरली. निलेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा फोटो शेअर करत त्यावर ‘डुक्कर’ असा उल्लेख केला आहे.
निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका करताना त्यांचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्यावर कॅप्शन लिहिलं की, ‘आज दुपारी कुडाळच्या जंगलात काही लोकांनी डुक्कर पकडला.’ अशी घणाघाती टीका निलेश यांनी केली आहे. मात्र, निलेश राणे यांच्या या ट्वीटवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. ‘आपले वडील सुसंस्कृत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते याची तरी जाणीव ठेवा,’ असा सल्ला एका ट्वीटर यूजर्सने दिला आहे.
आज दुपारी कुडाळच्या जंगलात काही लोकांनी डुक्कर पकडला. pic.twitter.com/FhYPHUmp7s
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 8, 2019
वास्तविक, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर स्थापन झालेलं भाजपचं सरकार अवघ्या ८० तासात कोसळल्यान विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले की, ‘अखेर नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले, आता नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे.’
अखेर मा.. नारायण राणे यांच्या पनवतीने मा. देवेंद्र फडणवीस बुडाले !!
आता मा.. नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे… @PTI_News #narayanraorane
— VinayakRaut_Official (@Vinayakrauts) November 26, 2019
दरम्यान, कोकणात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष नेहमीच दिसून येत असतो. त्यामुळे दोघेही एकमेकांवर आक्रमक टीका करत असतात. मात्र आता या टीकेची पातळी घसरली असून एकमेकांवर आरे-तुरे करून टीका करणं इथंपासून ते आता प्राण्यांची उपमा देणं इथंपर्यंत हे राजकारण पोहोचलं आहे.
कोकणातील राजकारण :
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे राजकारणातील एक प्रसिद्ध आहे . पण अलिकडच्या काळात कोकणातील राजकारणात राणेंची हवा कमी झाल्याचे दिसून येत आहे. कारण नारायण राणे यांचा मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तसंच त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांना २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पराभव पचवावा लागला. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश राणेंचा पराभव केला. तसेच २००९ च्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचे वैभव नाईक यांनी थेट नारायण राणे यांचा पराभव केला होत. त्यामुळे आता राणेंची कोकणातील पकड सैल झाल्याचे बोलले जातात आहे.
Viisit : bahujannama.com