बहुजननामा ऑनलाईन – जय श्री राम न म्हटल्याने उत्तर प्रदेशातील एका खलील अन्सारी या १५ वर्षाच्या तरुणाला पेटवल्याचं वृत्त आपण अनेक ठिकाणी वाचलं असेल. असं खूप प्रसिद्ध झालेलं हे वृत्त आहे. सोशल मीडियावर तर या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र सध्या या प्रकरणाची वेगळीच माहिती समोर आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि खलील अन्सारी हा रविवारी सकाळी घरातून बाहेर पडला होता. दरम्यान त्याला ४ तरुणांनी त्याला पकडले आणि त्याच्या तोंडावर कपडा बांधून त्याला शेतात नेले व त्याच्यावर तेल टाकून त्याला पेटवून दिल आणि तेथून पळ काढला. असा दावा त्या तरुणाच्या कुटूंबियांनी केला होता.
दरम्यान या प्रकरणाची कसून चौकशी केली असता. या तरुणाला कोणी पेटवून दिले नाही तर त्याने स्वतःच आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. हे समोर आले आहे. त्याला कोणीही शेतात नेवून पेटवलं नाही तर त्यानेच स्वतःला पेटवून घेतल. अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना दिली. आणि घटनेला जर तुम्ही जय श्री राम ची जोड दिली तर टीआरपी जास्त मिळेल असं काही तरुणांनी खलीलच्या आईला सांगितलं होत. त्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
या घटनेचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी घटनेच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी केली. तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आहे. यावरूनच या घटनेत कोणतंही तथ्य नसल्याचं पोलिसांनी समोर आणलं आहे. हा कट समाजात निव्वळ दोष पसरवण्यासाठी रचलेला आहे. असं समोर आलं आहे. तसेच या घटनेबाबत सोशल मीडियावर जर कोणी अजून अफवा पसरवली तर त्यावर कारवाई केली जाईल. असं सांगण्यात आलं आहे.