बीड : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील धनगर समाजाला न्याय देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे. त्यामुळे धनगर समाज मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडी सोबत आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून परिवर्तन घडणार असल्याचे मत धनगर समाज संघर्ष समितीचे बीड जिल्हाध्यक्ष दत्ता वाकसे यांनी केले आहे.
पुढे ते म्हणाले की बीड जिल्ह्यातील वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर जागृती करणार आहे. धनगर समाजाची 65 वर्षे काँग्रेस, आणि राष्ट्रवादी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली आणि 2014 ला काही तरी न्याय मिळेल म्हणून धनगर समाज हा संपूर्ण ताकदीने भारतीय जनता पक्षाच्या पाठिशी उभा राहिला परंतु राज्यातील धनगर समाजाला आरक्षणचे गाजर मिळाले आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही पहिल्या काँबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षणाचे प्रमाणपत्र सादर करू परंतु पाच वर्षे संपले लोकसभा निवडणूका आल्या आणि राज्यातील एक कोटी वीस लाख धनगर समाजाच्या हाती पुन्हा निराशा झाली आहे.
यामुळे धनगर समाज हा परिवर्तन घडवणार आहे त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नक्कीच परिवर्तन घडणार. बीड जिल्ह्यातील धनगर समाज हा मोठ्या ताकदीने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विष्णू जाधव यांच्या पाठिशी उभे राहावे असे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाध्यक्ष दत्ता वाकसे यांनी केले आहे. मेंढपाळ, कष्टकरी, दिनदलित, राजकीय सत्तेपासून वंचित असलेले वंचित समाज हा वंचित बहूजन आघाडी सोबत आहे आणि बीड जिल्ह्यातील धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात मताच्या माध्यमातून परिवर्तन घडवणार आहे असे देखील वाकसे म्हणाले.