बहुजननामा ऑनलाईन – ‘नरेंद्र मोदी एक कट्टर दहशतवादी आहेत. ते एक चांगले नागरिक नाहीत. मी अल्पसंख्यांक बंधू, भगिणींना सांगू इच्छितो की, जर तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिलंत तर देशात पुन्हा नव्या समस्या निर्माण होतील. मोदींनीच तिहेरी तलाक कायदा आणत तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याची योजना आखली’,नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत असे खळबळजनक विधान केल आहे. चित्तोड येथील सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी २००२ गुजरात दंगलीचा उल्लेख केला.दंगलीनंतर अनेक देशांनी त्यांच्यावर बंदी घातली. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अल्पसंख्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.
याआधी १ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांनी वारंवार टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यावर टीका करत ‘यु-टर्न बाबू’ असल्याचा टोला लगावला होता. टीडीपी लोकांचा डेटा चोरत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ‘मला सांगण्यात आलं आहे की, टीडीपीने सायबर क्राइमशी संबंधित सेवा मित्र अॅप सुरु केलं आहे. हे अॅप ना सेवा करत आहे, ना मित्र आहे. हे अॅप लोकांचा डेटा चोरत आहे तसेच खोटं बोलणे, यु-टर्न घेणे आता टीडीपी सरकारची ओळख झाली आहे असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता.