नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण आपल्या जीवनात काहीना काही बदल करत असतात. भारतीय रेल्वेनेदेखील प्रवाशांच्या सोयीनुसार आपल्या सेवांमध्ये बदल करत आहे. भारतीय रेल्वेने आपला हेल्पलाईन क्रमांक १३९ मध्ये मोठा बदल करत हा क्रमांक आता इतरही सेवांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकाचा वापर १ जानेवारीपासून होऊ शकतो, अशी माहिती भारतीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली.
पियुष गोयल यांनी ट्विट केले आहे की, अनेक वेगवेगळ्या हेल्पलाईन क्रमांकांचे एकीकरण करत १३९ या क्रमांकामध्ये बदल केला आहे. १ जानेवारीपासून याचा वापर केला जाणार असून प्रवाशांना वेगवेगळ्या क्रमांकांच्या ऐवजी आता एकच हेल्पलाईन क्रमांक १३९ लक्षात ठेवावा लागेल.
रेलवे की विभिन्न हेल्पलाइन नंबरों को एकीकृत कर 139 में बदल दिया गया है, यह नंबर इंटरएक्टिव वॉइस रिस्पांस पर आधारित है।
यह व्यवस्था 1 जनवरी से लागू की जा रही है, इसके शुरु होने पर यात्रियों को सहायता के लिये अलग अलग नंबरों के स्थान पर सिर्फ एक हेल्पलाइन नंबर 139 को याद रखना होगा। pic.twitter.com/r6Gj2Wjudv
— Piyush Goyal (@PiyushGoyal) December 31, 2019
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी अनेक सेवा-सुविधा सुरु होत्या. ज्यामुळे प्रवाशांना अनेकदा अडचणी येत असत. त्यासाठी नवीन वर्षात हेल्पलाईन क्रमांकामध्ये बदल करून १३९ या नंबरवर फोन करून आपल्या समस्या सोडवू शकतात.भारतीय रेल्वेने १३९ या क्रमांकाचे एकीकरण करुन एकच हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिला आहे. तसेच हा क्रमांक परस्पर व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टमवर आधारित असून प्रवाशांना अनेक नंबर लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही.
Visit : bahujannama.com