बहुजननामा ऑनलाइन टीम : नेपाळच्या महिला क्रिकेटपटू अंजली चंदने सोमवारी एकही रन न देता सहा विकेट घेऊन टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इतिहास रचला. पोखरा (काठमांडू) येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मालदीवविरुद्ध तिने एक करिश्माई कामगिरी केली. अंजली ही टी -२० मध्ये महिला आणि पुरुष या दोघांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज बनली आहे.
https://twitter.com/Nepal_Cricket/status/1201423491947515904
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मालदीव संघाला केवळ 16 धावा करता आल्या, नेपाळने हे लक्ष्य ०.५ षटकांत गाठले. २४ वर्षीय अंजलीने सातव्या षटकात तीन आणि नवव्या षटकात दोन विकेट घेतले. ११ व्या षटकात मालदीव डावाच्या शेवटी तिने आणखी एक विकेट घेतला. मध्यमगती गोलंदाजाने संपूर्ण सामन्यात केवळ 13 चेंडू फेकले. तिने शेवटच्या तीन चेंडूत तीन विकेट घेऊन हॅट्रिकही पूर्ण केली.
https://twitter.com/T20WorldCup/status/1201412331185553408
यासह अंजलीने महिला टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. यापूर्वी मालदीवच्या मॅस इल्साने यावर्षी चीनविरुद्ध तीन रन देऊन ६ विकेट काढले होते. पुरुष क्रिकेटमधील टी -२० मधील सर्वोत्तम गोलंदाजीचे विश्लेषण भारताच्या दीपक चहरच्या नावावर आहे, त्याने १० नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध ३.२ षटकांत सात धावा देऊन ६ विकेट्स घेतले होते.
Visit : bahujannama.com