चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाईन – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीचे जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवादी बौद्धधम्म दिला. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता. मात्र त्यांच्या महापरिनिर्वानानंतर ही जबाबदारी समाजातील प्रत्येकावर आली आहे. तेव्हा आपसातील हेवेदावे, राग मोह माया, मत्सर ,स्वार्थ बाजूला सारून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बौद्धमय करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. असे आवाहन भदंत ज्ञानज्योती स्थविर तपोवन बुद्धविहार संघरामगिरी चंद्रपूर यांनी केले.
खामगाव तालुक्यातील बोथाकाजी येथे पूज्य भदंत ज्ञानज्योती सेवासंघ, भीमशक्ती क्रीडा मंडळ व उपासक उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 7 व 8 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय भव्य सधम्म देसना समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या सधम्म देसना समारंभाचे उद्घाटक म्हणून पूज्य भदंत ज्ञानज्योती स्थविर तपोवन बुद्धविहार संघारामगिरी जी. होते. अध्यक्ष भदंत विनयपाल शेगाव,भदंत धम्मरक्षित नागपूर, भदंत स्वरानंद बुलडाणा,भदंत नागज्योती, भदंत बुद्धपुत्र गोमेधर, भदंत श्रद्धानंद,भदंत तन्हंकर यांच्यासह भिख्खू संघाची उपस्थिती होती. यावेळी भदंत ज्ञानज्योती यांनी मानवी जीवन जगत असताना तथागत गौतम बुद्धांच्या शांततामय मार्गाची गरज आहे.असे भावपूर्ण आवाहन केले