मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसवर ‘शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेल्याचा कोणताही परिणाम होणार नाही. यावर शरद पवार यांनी व्यक्त केले की, मला उमेदवाराची चिंता नाही. साताऱ्याच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे तीन अर्ज आले आहेत. ही जागा राष्ट्रवादी निश्चित राखेल,’ असा विश्वास त्यांनी दिला. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह काही आमदार व नेत्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते त्या पाश्वभूमीवर बोलत होते. ‘भाजपमध्ये जाणार नाही असं शिवेंद्रराजेंनीच मला सांगितलं होतं. साताऱ्याच्या खासदारांसोबत बैठक व्हावी, अशी त्यांची इच्छा होती.
आमचं असा ठरला होता की, संसदेच्या अधिवेशनानंतर चर्चा सुरु करू मात्र, त्याआधीच त्यांनी वेगळा निर्णय घेतला,’ असं पवार म्हणाले. पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादीच्या आमदारांनी काम होत नसल्याची करणे दिली आहेत. यातुन असा निष्कर्ष निघतो की, सत्ताधारी सूडबुद्धीनं वागताहेत आणि विरोधक त्यांना तोंड देऊ शकत नाहीत. साताऱ्यातून आणखी किती लोक पक्ष सोडून जाणार आहेत याची मला कल्पना नाही. परंतु, यशवंतराव चव्हाणांचा विचार ज्यांनी स्वीकारलाय ते असं काही करणार नाही. त्यांना विरोधात असल्याचा त्रास होईल. त्यांना चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांची नाळ मतदारांशी आहे.
असं देखील पवार म्हणाले. पवार यांनी असं देखील स्पष्ट केलं की, शिवेंद्रराजेंच्या पक्षांतराशी उदयनराजेंचा काहीही संबंध नाही. विरोधात राहून मतदारसंघातील कामं होत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला इतर काही कारणं आहेत असं म्हणणं बरोबर नाही,’ असे देखील त्यांनी व्यक्त केले.