मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पडणारं प्रत्येक झाड आपला एक आमदार पडेल, याची जाणीव सरकारला व्हायला हवी असे विधान आव्हाड यांनी केले आहे. काल संध्याकाळपासून आरेत वृक्षतोड सुरू झाली. आता झाडांना मिठ्या मारणारे, एकही झाड तोडू देणार नाही म्हणणारे कुठे गेले,’ असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
ट्विटरवरुन व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की , ‘काही दिवसांपूर्वी सगळीकडे आरे-आरे सुरू होतं. मात्र आता सगळीकडे झोपा रे सुरू झालं आहे. झाडं कापली जाणार म्हणून आधी काही जणांकडून कारे सुरू होतं. आरेला कारेनं उत्तर दिलं जातं. मात्र काल संध्याकाळपासून आरेत वृक्षतोड सुरू झाली. आता झाडांना मिठ्या मारणारे, एकही झाड तोडू देणार नाही म्हणणारे कुठे गेले. मुंबईकरांनी आरेतील वृक्षतोडीविरोधात आवाज उठवायला हवा. पडणारं प्रत्येक झाड आपला एक आमदार पडेल, याची जाणीव सरकारला व्हायला हवी.’
#SaveAarey #SaveAareyForest #RetweeetPlease pic.twitter.com/Lx4gGZY0c7
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 4, 2019
आंदोलक ताब्यात
मुंबईची फुप्फुसे म्हणून ओळखल्या जाणार्या आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास मेट्रो कारशेडच्या उभारणीसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने तसेच हायकोर्टाने परवानगी दिली आहे. आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात येत होती. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास साडेतीनशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. याविरोधात तरुणाईसह अनेक पर्यावरणप्रेमी संस्था एकत्र आल्या आहेत. यामुळे ‘आरे’मध्ये रात्रभर तणावाचं वातावरण होतं. आंदोलन शांत करण्यासाठी आणि वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Visit : bahujannama.com