ठाणे : बहुजननामा ऑनलाईन- सत्तेत येताना वर्षाला २ कोटी रोजगार निर्माण करू अशा घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने रोजगार तर निर्माण केलाच नाही उलट आहे ते रोजगार सुद्धा गेले देशातील आणि राज्यातील दिवेसंदिवस वाढणाऱ्या बेरोजगारीच्या विरोधात कुंभकरणासारख्या झोपलेल्या या सरकारला जाग आणण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.
या सरकारने जिएसटी सारखे प्रयोग करत महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने कंपन्या बंद पडल्या असून मोठ्या प्रमाणात युवकांचे रोजगार गेले आहे. म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले .एवढ्यावर सरकारला जाग आली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवास्थानाच्या बाहेर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. ठाण्यात रेल्वे स्थानक परिसरात प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबईचे आणि ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे ढोल बजाओ आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.
या सरकारच्या काळात गेल्या ४५ वर्षात नव्हता येवढा बेरोजगारीचा दर वाढला आहे. महाराष्ट्रात १ लाखांपेक्षा अधिक कंपन्या बंद पडल्या. एका राज्यात एवढ्या कंपन्या बंद पडल्या असतील तर देशात किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली असेल असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आज ठाण्यात हे आंदोलन केले आहे. जर सरकारला जाग आली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिली.