लखनऊ : वृत्तसंस्था – यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार’ अशी घोषणा केली होती. या घोषणेची बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती खिल्ली उडवत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जनतेच्या कल्याणासाठी मजबूर सरकारच चांगले, असे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांची महाआघाडी सत्तेत आल्यास ते सरकार मजबूर ठरेल. त्याउलट, बहुमतातील सरकार मजबूत असेल, अशी भूमिका मोदींनी प्रचारावेळी मंडळी होती. त्याचा संदर्भ देत मायावती यांनी मोदी सरकारवर घणाघात केलं आहे. केंद्रात आणि उत्तरप्रदेशात पूर्ण बहुमताची सरकारे आहेत. तसे असूनही उत्तरप्रदेशात आवश्यक ती सुधारणा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी मजबूत सरकारऐवजी मजबूर सरकार असलेलेच बरे. मजबूूर सरकार भीतीमुळे जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहील. ते सरकार एकतंत्री कारभार करणार नाही. त्या सरकारमधील नेते कायदा हाती घेणार नाहीत. तसेच, भ्रष्टाचार आणि अनागोंदीही करणार नाहीत,असे त्यांनी म्हंटले आहे बसप नेत्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
बसपाच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला जसे कि, उत्तरप्रदेशच्या पूर्वांचल विभागातील स्थिती अतिशय बिकट आहे. अपरिहार्यतेपोटी लोक त्या विभागातून दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. तेथील जनतेला प्रगती आणि चांगली कायदा-सुव्यवस्था स्थिती हवी आहे. असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.