नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपप्रणीत NDA सरकारने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेल्यावेळ पेक्षाही अधिक मताने निवडून आले त्यामुळे विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली होती तसेच ईव्हीएमऐवजी बॅलेटपेपरद्वारेच मतदान झालं पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ते म्हणाले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३७० लोकसभा मतदारसंघात घोळ असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ,गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएमवर लोक संशय घेत आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास त्यात स्पष्टता येईल आणि लोकांचा विश्वासही बसेल, असं सांगतानाच ३७० लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ झालाय. या मतदारसंघात जास्तीचं मतदान मोजलं गेलंय. याकडेही निवडणूक आयोगाचं लक्ष वेधल्याचं ते म्हणाले. ज्या देशात दोन महिने निवडणुका चालतात, तिथे दोन दिवस मतमोजणी झाली तर बिघडले कुठे? असा सवाल राज यांनी केला.
आयोगाकडून कसलीही अपेक्षा नाही ?
ईव्हीएम संदर्भातील सर्व मुद्दे निवडणूक आयोगाला पटवून दिले आहेत. पण त्यांच्याकडून आम्हाला कसलीही अपेक्षा नाही. तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही ? असा सवाल माध्यमांनी करू नये म्हणून ही औपचारिक भेट घेतली आहे, असं ते म्हणाले. ईव्हीएमची चीप अमेरिकेतून येते त्यामुळे ईव्हीएम मशीन हॅक होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला तयार नाही. जर मॅचच फिक्स असेल तर सामने खेळून काय फायदा ? असा सवाल त्यांनी केला.