नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये प्राणघातक कोरोना व्हायरस पसरत असून आणखी २५ जणांच्या मृत्यू झाला असून हा आकडा १३२ वर आला आहे.या विषाणूची दहशत आता चीनमधून भारतात पोहोचली असून चीनकडून भारतात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. त्यासाठी मुंबईमध्ये मोठी तयारी केली जात आहे. आतापर्यंत देशातील शहरांमधून कोरोनाची संशयास्पद प्रकरणे नोंदवली गेली असून सरकार कोरोनाचा सामना करण्यास आधीच तयार आहे. चीनमार्गे दररोज थेट उड्डाणे मुंबईत येत असून मुंबईतील रुग्णालयांमध्ये विशेष व्यवस्था केली आहे.
चीनमध्ये असणाऱ्या पाच भारतीयांना कोरोनाची आंशिक लक्षणे दिसून आली असून त्यांना तातडीने कस्तुरबा गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. एका व्यक्तीला पुण्यातील रुग्णालयात ठेवण्यात आले होते, पण तपासणीत सर्व नमुने नकारात्मक असल्याचे आढळले असून धोका टळला असे नाही. हा व्हायरस रोखण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून विमानतळावर थर्मल स्कॅनिंग व्यवस्था केली आहे. सोबतच राज्य सरकारने लोकांना या आजाराने घाबरून जाऊ नये, अशी विनंती केली आहे.
मुंबई, बंगळूर, हैद्राबादनंतर आता दिल्लीत कोरोना विषाणूची संशयास्पद घटना समोर आली असून दिल्लीत कोरोना बाधित तीन संशयित सापडले आहेत. त्यांना राम मनोहर लोहिया रग्णालयाच्या अलगाव वार्डमध्ये ठेवले आहे. त्यातील दोघेजण दिल्लीचे आणि एकजण एनसीआरचा आहे. काही दिवसांपूर्वी ते तिघे चीनहून भारतात आले होते. चंदीगडमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित प्रकार समोर आला असून चीनमधून २८ वर्षांचा माणूसही असुरक्षित आहे.
Visit : bahujannama.com