नागपूर बहुजननामा ऑनलाईन – दंगल गर्ल जायरा वसीमने आपण बॉलीवूड सोडत असल्याच्या जाहीर केलेल्या निर्णयाबाबत नेटकऱ्यांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. जायराने हा निर्णय इस्लामधर्माची शिकवण डोळ्यासमोर ठेवून घेतला असल्याचे चर्चा असल्यामुळे त्यावर अनेक साधक -बाधक चर्चाही चालू आहेत त्यातच आपल्या लिखाणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ज्येष्ठ लेखिका तसलीमा नसरीन यांनी उडी घेतली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे कि नारीद्वेष व पारंपारिकतेने भरलेल्या समाजात स्त्रीचे ब्रेन वॉश केले जाते. तिने पुरुषाच्या अधीन रहावे, अवलंबून रहावे, अशिक्षित रहावे, गुलाम असावे, भोगदासी व्हावे, मुले सांभाळणारे यंत्र बनावे असेच हा समाज अपेक्षितो. स्त्रीला स्वातंत्र्य तर नाहीच पण निवडीची संधीही नाही.
जायराने घेतलेल्या या निर्णयांमुळे अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करत तिच्या या निर्णयस्वातंत्र्य अबाधित राखले जावे असेही म्हटले आहे.
https://twitter.com/taslimanasreen/status/1145568911905021953