बहुजननामा ऑनलाईन – सरकारने जाहीर केलेली नऊशे होमगार्डची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात अचानक रद्द केली. त्यामुळे नागपुरातील शेकडो तरुणांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त करत आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने जाहीर केलेल्या होमगार्डच्या निवड प्रक्रियेतील तांत्रिक चुका अनियमिततेमुळे ही गुणवत्ता यादी रद्द करण्यात आली आहे. मात्र संबंधितांनी केलेल्या चुकांची शिक्षा आम्हाला कशासाठी असा प्रश्न या आंदोलकांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी प्रशासन आणि गृहविभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात घोषणाबाजीही केली. तर कॉंग्रेस पक्षानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.