बहुजननामा ऑनलाईन टीम – कोणाच्या नशिबात काय लिहिलेलं असत हे कोणालाही ठाऊक नसत. आज श्रीमंत असणारा व्यक्ती एका रात्रीत गरीब होतो तर गरीब असणारा व्यक्ती एका रात्रीत श्रीमंत होतो. यासारखे अनेक उदाहरण आपण पाहिलेले आहेत. अशीच एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. एक रिक्षावाला रातोरात श्रीमंत झाला. या रिक्षा वाल्याला ५० लाखांची लॉटरी लागली.
हा रिक्षावाला पश्चिम बंगालमधल्या पूर्व वर्धमान जिल्ह्यातील गुस्करामध्ये वास्तव्याला होता. गौर दास असे या रिक्षावाल्याचा नाव असून त्याला रविवारी नागालँड सरकारची स्टेट लॉटरी लागली आहे. काही दिवसापूर्वीच दास आणि त्याचे मित्र कंपनी नागालँडला पिकनिक साठी निघाले होते. परंतु मुसळधार पावसामुळे त्यांनी पिकनिक रद्द केली. याच दरम्यान एका लॉटरी विक्रेत्यांनी लॉटरी तिकीट घेण्यास दास यांना आग्रह केला होता.
याविषयी बोलताना दास म्हणाले, “खरं तर मला तिकीट खरेदी करायचे नव्हते पण या तिकीट विक्रेत्याने मला इतका आग्रह केला की मला तिकीट घ्याव लागल. यावेळी माझ्या कडे केवळ ७० रुपयेच होते. रविवारी दुपारी मी या लॉटरी चा रिझल्ट पाहण्यासाठी गेलो होतो. यावेळी मी जे पाहिलं ते मी कधीच विसरू शकत नाही. यावेळी मला ५० लाखांचं बक्षीस लागल्याचं समजलं. दास यांच मध्यमवर्गीय कुटुंब आहे. दासला दोन मुली आणि एक मुलगा आहे.
Visit : bahujannama.com