सातारा : बहुजननामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा संतोष पोळ हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. जावळी तालुक्यातील मेढा मारली घाटात एकाच कुटुंबातील चौघांना गुंगीचं औषध देऊन त्यांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यांचा खून झाला ते सर्व बांमनोली गावातील आहेत. आरोपीनं 2 मुलासंह आई वडिलांना घाटातील जंगलात मारून फेकून दिलं. या प्रकरणी जावळी तालुक्यातील सोमर्डी गावातील आरोपी योगश निकम याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुलांना आर्मीत भरती करतो असं सागंत आरोपीनं आर्थिक व्यवहार केले आणि हे हत्याकांड केलं. आधी या आरोपीनं दोन्ही सख्ख्या भावांना संपवलं. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांना देखील अशात पद्धतीनं अज्ञात ठिकाणी नेऊन गुंगीचं औषध दिलं आणि नंतर त्यांचा खून केला. त्यानं मारली घाटात मृतदेह फेकून दिले होते.
आरोपीनं नोकरीला लावतो असं सांगून जे काही पैसे उकळले होते ते त्याला लाटायचे होते. या एकाच उद्देशासाठी त्यानं हे हत्याकांड केलं जेणेकरून ते पुन्हा पैशांसाठी कोणताही तगादा लावणार नाहीत. साताराचं नव्हे तर सांगली जिल्हादेखीय या घटनेनं हादरला आहे.
मृतांची नावं पुढीलप्रमाणे-
1) वडिल – तानाजी जाधव (वय 55)
2) आई मंदाकिनी जाधव (वय 50)
3) मुलं – तुषार जाधव (वय (26) आणि विशाल जाधव (वय 20)