नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोन मोरेटोरियम समाप्त होताच देशातील जवळपास 4 कोटी एमएसएमईवर आार्थिक संकटाचे ढग जमू लागले आहेत. हे एमएसएमई ट्रेड, हॉटेल, ट्रान्सपोर्ट व अन्य सर्व्हिस सेक्टरशी संबंधीत होते. या एमएसएमईचे म्हणणे आहे की, या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊनची सुरूवात झाल्यानंतरच सर्व्हिस सेक्टरचा व्यवसाय ठप्प आहे. अशात, ते बॅकांना कर्जाचे हप्ते किंवा व्याज देण्यास सक्षम नाहीत. लोन मोरेटोरियम बंद झाल्याने आता मासिक हप्ता न भरल्यास किंवा व्याज न दिल्याने बँकांची एनपीए खातीसुद्धा वाढतील, ज्याची शंका अगोदरच व्यक्त केली गेली आहे.
एमएसएमई मंत्रालयानुसार देशात 6.33 कोटी एमएसएमई आहेत. यापैकी 4.36 कोटी एमएसएमई ट्रेड व अन्य सर्व्हिस सेक्टरशी संबंधित आहेत. चेंबर ऑफ इंडियन मायक्रो, स्मॉल अँड मीडियम इंटरप्रायजेसचे प्रेसिडेंट मुकेश मोहन गुप्ता यांच्यानुसार आवश्यक क्षेत्र किंवा मॅन्यूफॅक्चरिंगच्या काही क्षेत्र वगळता कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय झालेला नाही. विशेषता सर्व्हिस सेक्टर तर पूर्णपणे ठप्प आहे. अशावेळी, सरकारने एमएसएमईसाठी लोन मोरेटोरियमच्या कालावधीत किमान सहा महिन्याचा विस्तार केला पाहिजे. सर्व्हिस सेक्टरशी संबंधित एमएसएमईने म्हटले की, सरकार स्वता हे मान्य करत आहे की, ही महामारी अॅक्ट ऑफ गॉड आहे, मग त्यांचे बँकवाले व्याज आणि व्याजावर व्याज मागण्यासाठी सतत मॅसेज का पाठवत आहेत.
सोमवारी चालू आर्थिक वर्षात 2020-21 च्या पहिल्या तिमाहीच्या (एप्रिल-जून) जीडीपी आकड्यांवरून सुद्धा ट्रेड व अन्य सर्व्हिस सेक्टरचे कामकाज प्रभावित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जीडीपी आकड्यांनुसार पहिल्या तिमाहीत ट्रेड, ट्रान्सपोर्ट, हॉटेल, कम्युनिकेशन व अन्य सर्व्हिस सेक्टरच्या जीव्हीएमध्ये मागच्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत 47 टक्केची घसरण नोंदली गेली आहे.
एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत लोन मोरेटोरियमच्या दरम्यान उद्योजकांनी हप्ता न देण्याची सूट होती आणि यामुळे त्यांच्या सिबिल स्कोअरवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांच्या खात्याला एनपीए मानले गेले नाही. परंतु, आता हप्त्यामधील त्यांचे व्याज सुद्धा मुळ रक्कमेत जोडले गेले आहे आणि आता ते सर्व हप्त्याच्या रूपात भरावे लागणार आहे. मात्र, हप्ता किंवा व्याज न भरल्यास एमएसएमई लोन रिस्ट्रक्चर करता येऊ शकते, परंतु हे बँकेवर अवलंबून असेल की रिस्ट्रक्चरिंगच्या नंतर पैसे भरण्यासाठी कोणते मॅकेनिज्म असेल.
सर्व्हिस सेक्टरच्या छोट्या उद्योजकांनी सांगितले की, जोपर्यंत व्यवसाय कोरोनापूर्वीच्या काळाप्रमाणे सुरळीत होत नाही, ते कोणत्याही प्रकारचा हप्ता किंवा व्याज देण्याच्या स्थितीत नाहीत. हे उद्योजक दुसरी बँक किंवा इतर अन्य प्रकारे आपल्या व्यवसायाची व्यवहार करण्याच्या तयारीत आहेत. कारण ज्या बँकेत यांचे अगोदरपासून खाते आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे येताच बँक सर्वप्रथम आपले व्याज आणि हप्ता कापून घेईल. दुसरीकडे या उद्योजकांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी रोखडची खुप गरज आहे.