मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वसई ते गोरखपूर ही श्रमिक स्पेशल ट्रेनमधले प्रवासी काल (22 मे) संध्याकाळी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर स्थानकावर पोहोचणे अपेक्षित होते. मात्र आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही ट्रेन ओडिसाच्या राऊरकेला स्थानकावर पोहोचल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आधी कोरोनाने गाडले आणि आता रेल्वेने गंडविले असा सुर नागरिकांनी काढला आहे.
लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागांमध्ये अडकलेल्या परप्रांतिय मजुरांसाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या. या ट्रेनमधून मुंबईसह राज्यभरातून हजारो मजूर गावी परतले. वसईहून उत्तर प्रदेशला निघालेली ओडिसाला पोहोचली. कोणतीही पूर्वकल्पना न देता ट्रेनचा मार्ग बदलल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे. 21 मे रोजी वसई ते गोरखपूर या श्रमिक स्पेशल ट्रेनमधले प्रवासी काल (22 मे) संध्याकाळी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर स्थानकावर पोहोचणे आवश्यक होते.
मात्र, आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही ट्रेन ओडिसाच्या राऊरकेला स्थानकावर गेल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. जवळपास 36 तास प्रवास केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये नसून ओदिशामध्ये पोहोचल्याचे कळताच प्रवासी गोंधळले असून संबंधितांना विचारपूस करत आहेत. मात्रा त्यांना कोणीही समाधानकारक उत्तर देत नसल्याची तक्रार ते मोबाईल व्हिडियो द्वारे करत आहेत. रेल्वेचालक रस्ता चुकल्याचा दावा प्रवाशांकडून केला जात आहे.