अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यानंतर या निर्णयावरून संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आणि सरकारचा निषेध केला. पुणे शहरात सुरू झालेलं आंदोलन संपूर्ण राज्यात गेलं. तर अमरावती येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. विद्यार्थ्यांना पोलिसांनी कॉलर पकडून जबरदस्तीने गाडीमध्ये बसवलं, या प्रकरणावरून माजी मंत्री अनिल बोंडे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
त्यावेळी पोलिसांनी म्हटलं, आम्ही सरकारकडे मागणी करतोय, तुमच्याकडे नाही, तर तुम्ही आंदोलन केलं आहे, त्यावर आम्हाला नियंत्रण आणावं लागेल, तुम्ही आम्हाला शहाणपणा कसा शिकवता? असा प्रश्न पोलिसांनी केला. यावरून अनिल बोंडे यांनी एवढ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना तुम्ही आतमध्ये कोंडलं, तुम्हाला समजत नाही का? असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी केला आहे. पोलीस आणि अनिल बोंडे यांच्यातील शाब्दिक वाद वाढत असतानाच अनिल बोंडे यांनी तुम्ही सरकारचे कुत्रे आहात म्हणून म्हटलं. त्यावर संतप्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यानेही प्रत्युत्तर देत ‘तुम्ही पण कुत्रेच असल्यांच म्हटलं आहे. यानंतर पोलिसांनी अनिल बोंडे यांना ताब्यात घेतलं आहे.
नेमकं प्रकरण काय घडलं?
अमरावती येथील आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस गाडीमधून बाहेर काढण्यासाठी सरसावलेले माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना एका पोलीस अधिकाऱ्यांनी मनाई केली. तर विद्यार्थी हे स्वत:च्या हक्कासाठी लढा देत आहेत,असे बोंडे म्हणाले. परंतु, कोरोनाकाळात आंदोलन करता येत नाही, सरकारकडे मागणी करा, असे पोलीस ठाणेदार चोरमले म्हणाले. त्यावर संयमाने बोला, संयम शिकवू नका, असे अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले. मुलींना पोलीस व्हॅनमधून कोंबून नेता. महिला पोलीस सोबत नाही, त्या काही चोर नाहीत, असा प्रश्न मुद्दा बोंडे यांनी केला. चोरमले तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून झाले का, असेही त्यावेळी ते म्हणाले. परत आंदोलकांना संधी दिली आहे, असे चोरमले म्हणाले. यावरून वाद उफाळला गेला.