मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दिल्ली उच्च न्यायालयाने देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या देवांगना कलिता, नताशा नरवाल आणि आसिफ इक्बाल तन्हा या तीन विद्यार्थी आंदोलकांना जामीन मंजूर केला. गतवर्षी बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्यानव्ये (यूएपीए) गेल्या वर्षी या तिघांना अटक करण्यात आली होती. यावरून सरकारची दिल्ली उच्च न्यायालयाने कानउघाडणी केली. त्यामुळे राष्ट्रभक्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे. राष्ट्रनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा या मुद्द्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी रोखठोक सदरातून या भूमिका मांडली. त्याचबरोबर फ्रान्समधील नेते द गॉल याचं उदाहरण देत मोदी सरकार आणि भाजपाला सुनावलं आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page for every update
देशावर प्रेम करणे व राज्यकर्त्यांवर प्रेम करणे म्हणजे देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. मात्र आपल्या देशात यात गल्लत होताना दिसत आहे. स्वामीनिष्ठा ही राजनिष्ठा असू शकते. पण त्यास देशभक्ती कसे म्हणाल? एक वर्षानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने नताशा नरवाल, देवांगना कलिता या आंदोलकांना मुक्त करताना सरकारच्या मनसुब्यांवर ताशेरे ओढले. त्यांच्यावर सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतला म्हणून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.
त्याचवेळी लक्षद्वीप बेटावरील सिनेनिर्मात्या आयशा सुल्ताना यांनाही केरळ हायकोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. आयशा यांनी लक्षद्वीपच्या राजकीय प्रशासकांवर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. देशात राष्ट्रद्रोह इतका स्वस्त होईल असे वाटले नव्हते. राजावर प्रेम न करणारे देशद्रोही या विचारांवर न्यायालयाने आसूड ओढले आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, सरकारविरुद्ध बोलायचे नाही. तसे केले तर सरकार उलथविण्याचा कट रचला म्हणून खटले दाखल होतील. या भीतीवर सर्वोच्च न्यायालयाने उतारा दिला आहे. असेही म्हंटले आहे.
काय म्हंटले आहे रोखठोक सदरात …
आप पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी अयोध्येतील राममंदिराच्या जमीन खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. अयोध्येतील एक जमीन पाच मिनिटांपूर्वी फक्त दोन कोटी रुपयांत खरेदी केली. तीच जमीन राम जन्मभूमी न्यासाने पुढल्या पाच मिनिटाला १८ कोटी रुपयांना खरेदी केली. हा राममंदिराचा जमीन घोटाळा उघडकीस आणल्यामुळे शिवसेनेसह अनेक पक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर हल्ला केला. मुंबईत शिवसेना भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. ज्यांनी या जमीन घोट्याळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांना हिंदुद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही,” असं राऊत MP Sanjay Raut |यांनी या सदरात म्हटलं आहे.
वाद जुनाच !
सनातन काळापासून देशनिष्ठा की राजनिष्ठा हा वाद सुरूच आहे. नरेंद्र मोदींवर जे निष्ठा ठेवत नाही ते देशाचे नाहीत असे सध्या बोलले जाते. इंदिरा गांधींच्या काळातही अशीच अवस्था होती. ‘इंदिरा इज इंडिया, इंदिरा म्हणजेच भारत’ ही घोषणा त्याच राजनिष्ठेतून निर्माण झाली. दरम्यान १९७८ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला म्हणजे देश हरला, असे मानायचे काय? व्यक्ती येतात व जातात. देश तेथेच असतो. त्याचे कणखर पोलादी नेतृत्व राष्ट्रनिष्ठा घडवत असते. सत्य बोलणाऱ्यांना राष्ट्राचे शत्रू ठरवून तुरुंगात ढकलले जातात. आज विविध तुरुंगात अशा कैद्यांचा आकडा नेमका किती आहे? फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष जनरल द गॉल हे एक मानी स्वभावाचे गृहस्थ होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात गॉल यांच्या सत्यवादाचा कस लागला.
हिटलरच्या संभाव्य हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी त्यावेळी फ्रेंच सरकारने अब्जावधी रुपये खर्च करून मॅजिनो तटबंदी उभारली. त्यानंतर ही तटबंदी अभेद्य आहे, असा डंकाहि पिटला मात्र द गॉलने एक पुस्तक लिहून मॅजिनो तटबंदी कशी कुचकामी आहे हे पुराव्यासह दाखवून दिले. त्यानंतर भडकलेल्या फ्रेंच सरकार व लष्करी अधिकाऱ्यानी गॉल देशनिष्ठ नसल्याचा अपप्रचार सुरु केला. दरम्यान, जर्मन फौजांनी स्वारी केली. मॅजिनो तटबंदी जर्मन फौजेला चार दिवसही रोखू शकली नाही. त्यामुळे द गॉलचेच म्हणणे शंभर टक्के बरोबर होते. याचा अनुभव फ्रान्सने लगेच घेतला. द गॉलने सत्य सांगितले यापेक्षा राष्ट्रनिष्ठा दुसरी कोणती असू शकते?, असे उदाहरण देत राऊत यांनी देशातील राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.
“जर्मन सेनापती जनरल रोमेलविषयी अशी ख्याती होती की, तो अडचणीत सापडला की शत्रूला अधिक घातक ठरे. काही व्यक्तीचे रसायनच असे असते की संकट काळात त्यांची गुणवत्ता आणि राष्ट्रनिष्ठा उसळून येते. टिळक, गांधी, चर्चिल, सावरकर, ठाकरे ही या वर्गातील माणसे. द गॉल यांचा वर्ग तोच. हिटलरच्या सैन्यापुढे सर्व फ्रेंच सेनापतींनी हातपाय गाळले. फ्रेंच सैन्य लाखोंच्या संख्येने प्रतिकार न करता शरण गेले. पण या अवस्थेत द गॉल व त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्य तुकडीने मात्र अत्यंत निकराचा लढा दिला.
फ्रेंच सरकारने शरणागती पत्करल्यानंतर ते फ्रान्समधून निसटले व त्यांनी हिटलरविरोधाचा ध्वज फडकवत ठेवला. आता राष्ट्रनिष्ठा म्हणजे काय ते पहा. ”द गॉल हा मानी पुरुष होता. कोणत्याही अवस्थेत ते स्वतः दुय्यम दर्जा स्वीकारायला तयार नसत व आपल्या देशाचा अपमान सहन करीत नसत. परागंदा फ्रेंच सरकारचे नेते असतानाही ते प्रे. रुझवेल्ट, चर्चिल आदी बड्या राष्ट्रांच्या नेत्यांशी बरोबरीच्या नात्याने वागत. फ्रान्सला थोडासा कमीपणा येतो, असे दिसले की ते या बड्यांच्या बैठकीतून ताडताड पाय आपटीत बाहेर पडत! रुझवेल्ट म्हणत, हिटलर परवडला; पण मित्र म्हणूनदेखील द गॉल नको. ते खरेच. गॉल हे राजनिष्ठ, स्वामीनिष्ठ नव्हतेच. ते फक्त राष्ट्रनिष्ठ होते. म्हणून त्यांचा हा लढा होता.”
राज्य अस्थिर कसे होईल ?
राष्ट्र संकटात असतांनाही जे फक्त राजनिष्ठ म्हणून वावरतात त्यांच्यापासून राष्ट्राला खरा धोका आहे. सध्याच्या परिस्थिती राष्ट्रद्रोह म्हणजे नक्की काय?
हे कोणीच सांगू शकत नाही.
सरकारच्या चुका दाखवणे म्हणजे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असू शकत नाही.
सरकारविरुद्ध आंदोलनात सहभाग घेऊन घोषणा देणे त्याबद्दल राजद्रोह दहशतवादासारखी कलमे लावून बेमुदत तुरुंगात टाकणे या ‘राजनिष्ठेला’च कोणी राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती समजत असतील तर देश संकटात आहे.
काही वेळा शत्रूसोबत लढणे सोपे असते पण राजनिष्ठांच्या फौजांबरोबर लढणे अवघड असते.
प्रभू श्रीराम १४ वर्षे वनवासात गेले ती राजनिष्ठा होती.
अयोध्या राज्यात सुख व शांती नांदावी यासाठी त्यांनी पित्याचा आदेश मानला.
ते गृहकलह टाळण्यासाठी घराबाहेर पडले.
वडिलांची अडचण समजून ते वनवासी झाले.
डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला.
त्यानंतर जो बायडन हे विजयी झाल्याचे अधिकृतपणे जाहीर होताच ट्रम्प यांचे शेकडो समर्थक अमेरिकेच्या संसदेत घुसून त्यांनी गोंधळ घातला.
ही ‘ट्रम्प’ या व्यक्तीच्या प्रती दाखवलेली राजनिष्ठाच होती.
त्या दिवशी जगातील सर्वात बुलंद लोकशाहीत राष्ट्रनिष्ठेचाही पराभव झाला.
राममंदिराच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी करणाऱ्य़ांना राष्ट्रद्रोही ठरवणे ही राजनिष्ठा आहे.
महागाई, भ्रष्टाचार, आर्थिक बजबजपुरी, आरोग्यविषयक अराजक माजले असतानाही अशा सरकारची पाठराखण करणारे राजनिष्ठच ठरतात. ते सर्व देशभक्तीत मोडत नाहीत.
देशभक्ती व राजनिष्ठा यात देशभक्तीलाच महत्त्व असायला हवे.
प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये सदासर्वदा देशभक्ती ही वास्तव्य करीत असली पाहिजे.
राजा चांगला असेल त्या वेळेला देशभक्ती आणि राजनिष्ठा यांची एक वाक्यताच असते.
कारण त्या वेळी राजावर निष्ठा ठेवल्यानेच देशभक्ती केल्याचे पुण्य प्राप्त होते.
परंतु राजा वाईट, मतलबी, व्यापारी वृत्तीचा असेल त्या वेळेला राजनिष्ठेपेक्षा देशभक्तीचे महत्त्व जास्त आहे.
फ्रेंचचा लोकनेता ‘द गॉल’प्रमाणे राजा असेल तर राजनिष्ठा व देशनिष्ठा एकाच माळेचे मणी असतात.
पण आता ‘द गॉल’ कोठे राहिलेत?, असा सवालहि संजय राऊत यांनी रोकठोक सदरात केला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page for every update
Web Titel : MP Sanjay Raut shiv sena mp sanjay raut on modi government in saamana rokhthok
प्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढणार ! आता NIA करणार ‘हे’ काम
Video : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी भारतीय आर्मीनं बनवलं ‘ढोल रॅम्प’, व्हायरल झाला व्हिडीओ
Murder Case | भाच्याच्या खुनाचा बदला, आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढल