नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कला, संस्कृती आणि परंपरा यांची जपणूक करणारी धरती म्हणजे भारत देश. म्हणूनच भारतात खूप काही पाहण्यासारखे असून जर आपण कितीही भटकंती करणारे हौशी पर्यटक असताल तरी भारतातील अनेक गोष्टी आपल्या पाहण्यातून सुटल्या आहेत किंवा त्याबद्दल आपल्याला माहीतही नाही. जर आपल्याला संपूर्ण भारत फिरायचा असेल तर त्याच-त्याच ठिकाणी जाऊन काय उपयोग? काश्मीरला पृथ्वीचा स्वर्ग म्हटले जाते, पण काश्मीरसारखे अनेक शहरे भारतात आहेत. ही गावं दिसायला जरी छोटी असली तरी काश्मीरपेक्षा कमी नाहीत. जाणून घेऊ या अशा चार गावांबद्दल…
मेघालायची राजधानी असलेल्या शिलॉंग पासून ११ कि.मी. वर डोंगरावर असलेले ‘स्मित’ गाव हे जसे की निसर्गाची चादर ओढून बसल्यासारखी दिसते. तसेच शहराच्या प्रदूषणापासून लांब असलेल्या या गावातील शुद्ध हवा आणि ताजेपणा आपला तणाव दूर करते. याच कारणामुळे या गावाला प्रदूषणमुक्त गावाचा दर्जा दिला गेला आहे. या गावातील निसर्गाचे दृश्य आपल्याला आश्चर्यचकित करेल, इतके हे गाव सुंदर असून या गावात राहणारे लोक भाजीपाला आणि मसाले पिकांची शेती करतात.
हिमाचलच्या कुल्लू खोऱ्याच्या उत्तरेस मलाना हे गाव पार्वती खोऱ्याच्या हिरव्यागार निसर्गाने व्यापलेले असून मलाना नदीजवळील सुंदर टेकड्यांच्या काठावर वसलेल्या या गावाचे सौंदर्य खूपच अवर्णनीय आहे. लोकांना तेथील अदभूत दृश्ये आकर्षित करतात. त्यामुळे तेथे जाणारे पर्यटक गावाबाहेर कॅम्प लावून थांबतात. पण तेथे बाहेरील लोकांना गावात जाण्यास आणि तेथील वस्तूंना स्पर्श करण्यास मनाई आहे.
मिरीक हे दार्जिलिंगच्या पश्चिमेकडे समुद्रसपाटीपासून सुमारे ४९०५ फूट उंचीवर वसलेले एक छोटेसे गाव असून हिमालयाच्या मैदानावर देवदाराने वेढलेला मिरीक तलाव येथील दृश्यांना अधिकच सुंदर बनवतो. येथील चहाचे मळे, वन्य फुलांची चादर, क्रिप्टोमेरियाचे वृक्ष हे येणाऱ्या पर्यटकांना खूप आकर्षित करतात.
निसर्गावर प्रेम करणाऱ्या खूपच कमी लोकांना आशिया खंडातील पहिले हरित गाव म्हणून ‘खोमोना’ या गावाला घोषित करण्यात आले आहे. हे गाव कोहिमा पासून २० किमी दूर खोमोनाच्या मैदानावर आहे. या गावात १०० पेक्षा जास्त जाती-जमातीचे लोकं राहतात. जर आपण या गावाला बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येईल की खोमोनामध्ये असलेले प्रत्येक घर हे एकमेकांशी जोडलेले असून याशिवाय याशिवाय येथे बांधलेल्या प्रत्येक घराच्या दाराशी एक खास प्रकारचे शिंग लावलेले असते. हे ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी लटकवण्यात आले असल्याचे सांगितले जाते. येथे सुमारे २५० प्रजातींच्या वनस्पती आढळतात.